Monday, February 15, 2021

प्रस्तावना -- UPSC प्लानर या मनोहर गोळे यांच्या पुस्तकासाठी

 

प्रस्तावना


श्रीमती लीना मेहेंदळे (निवृत्त IAS)

माजी अतिरिक्त मुख्य सचिव, महाराष्ट्र राज्य


स्पर्धा, परीक्षा आणि प्लॅनिंग अर्थात् योजनापूर्वक अभ्यास हे तीन पैलू तपासणारे पुस्तक व ते ही सरळ सोप्या मराठमोळ्या धड्यांच्या माध्यमातून. लेखक श्री. मनोहर भोळे यांचा हा उपक्रम स्तुत्य म्हणावा लागेल.

मानव समाज घडला तेंव्हापासून समाजासाठी सुव्यवस्थेची गरज भासू लागली आणि तेंव्हापासूनच अशी सुव्यवस्था टिकवण्यास सक्षम अशा व्यक्तींचीही गरज भासू लागली. त्यातूनच सुशासन, न्याय, न्यायदेवता, नीतिशास्त्र, समाजनीति, राजनीति, दंडविधान, धर्माचरण इत्यादी शब्द उदयाला आले. हे सर्व शब्द समष्टिदर्शक आहेत व त्यांमध्ये समाजाचे अस्तित्व गृहीत धरलेले आहे. एवढेच नव्हे तर ते समाज अस्तित्व - म्हणजेच मानवी समूहांचे सहअस्तित्व टिकून राहिले पाहिजे व त्यासाठी व्यक्तिगत वागणुकीच्या काही सीमारेषा ठरल्या असल्या पाहिजेत ही भावना देखील समाजधारणेसाठी महत्वाची ठरते.

समाज व्यवहारात अगोदर म्हणजेच अगदी सत्ययुगांत अनुभवी व्यक्तींनी घालून दिलेले नियम पालन, त्यानंतर राजेशाही प्रणालीने ते नियम लागू करून घेणे आणि आता जगभर असलेल्या लोकशाही राज्यव्यवस्थेही तसे नियम पालन होणे ही प्रक्रिया आपल्याला दिसून येते. थोडक्यांत, कोणताही कालखंड पाहिला तरी समाज व्यवस्थेसाठी नियम व नियम पालनासाठी यंत्रणा यांची गरज नेहमीच राहिलेली आहे.

वर्तमान भारताबद्दल बोलूया. आपला भारत हा अतिविशाल आणि जागतिक लोकसंख्येतील दुसरा देश आहे. इथे एक प्रशासनाची व्यवस्था आहे. त्यामध्ये नवनवीन भरती होत असते. ती परीक्षांच्या माध्यमातून होते आणि स्पर्धा हा शब्द का? तर परीक्षार्थींची संख्या ही अवाढव्य असल्याने त्यातून थोडेसेच उमेदवार निवडतांना अधिक योग्य उमेदवार मिळावेत यासाठी या परीक्षांचा स्तरही वाढवावा लागतो. अशी परीक्षा उत्तीर्ण व्हायची असेल तर तयारीही जोरदार असायला हवी. त्याचे प्लॅनिंग कसे करावे? हे समजावून देण्यासाठी हे पुस्तक.

आधीच हे स्पष्ट करते की पुस्तक वरकरणी जरी IAS/UPSC या स्पर्धा परीक्षांसाठी आहे असे म्हटले असले तरी भारतातील अनेकविध कर्मचारी भरतीसाठी स्पर्धापरीक्षा घेतल्या जातात व या पुस्तकातील कित्येक सूत्र, कित्येक पद्धती सर्वच परीक्षांच्या तयारीसाठी उपयुक्त आहेत. त्यामुळे यातील बराचसा भाग इतरांसाठी उपयोगी आहे - म्हणजे MPSC, बँक, आर्मड् फोर्सेस इत्यादी सर्व तर्‍हेच्या परीक्षांसाठी. एवंच या पुस्तकातील अध्यायांचे दोन भाग पडू शकतील - सरसकट सर्व परीक्षांसाठी आणि केवळ UPSC परीक्षांसाठी.

पुस्तकाचे प्लॅनर हे शीर्षकच सांगून जाते की, परीक्षार्थींनी योजनापूर्वक परीक्षांची तयारी व अभ्यास केला पाहिजे. त्यासाठी या परीक्षा कशा पद्धतीने घेतल्या जातात? हे माहित पाहिजे. अभ्यासक्रम काय असतो? त्याची तयारी कशी करावी? परीक्षा लिहिताना आधी-नंतर काय काळजी घ्यावी, इत्यादी अनेक प्रश्‍नांची उकल विद्यार्थ्यांना असली पाहिजे. त्यादृष्टीने लिहिलेल्या 15 अध्यायांमध्ये विभागणी पाहिल्यास पहिला व तिसरा अध्याय परीक्षेची संरचना व अभ्यासक्रम समजण्यासाठी, तेरावा-चौदावा अध्याय निवडून आलेल्या उमेदवारांसाठी, बारावा अध्याय सर्वांत शेवटच्या मुलाखत या टप्प्यासाठी असल्याने मी त्यांची विवंचना करीत नाहीये. शेवटचा पंधरावा अध्याय एकूण अभ्यासक्रमाबाबत आहे.

मात्र मराठीतून पेपर लिहिणे का सोपे किंवा महत्त्वाचे आणि ते लिहिण्याच्या - विशेषत: दुर्वेध टर्मिनॉलॉजी हाताळण्याच्या सोप्या ट्रिक्स काय आहेत. मुलाखतीसाठी भाषा कोणती निवडावी? मराठी का हिंदी का इंग्रजी - त्याचे निकष काय असावेत याची चर्चा व्हायला हवी. उदा. एखादा मराठी टर्मिनॉलॉजीचा शब्द फारसा माहित नाही असं वाटत असेल तर उत्तर लिहितांना त्या शब्दानंतर आवर्जून त्याचा इंग्लिश प्रतिशब्द लिहावा.

पुस्तकात श्री. मनोहर भोळे यांनी समाविष्ट केलेली काही माहिती फारच उपयोगी असून त्याबद्दल त्यांचे अभिनंदन आहे. विशेषत: पूर्व परीक्षेच्या पेपरमधील विषयांचे संख्यात्मक विश्‍लेषण. यामध्ये परीक्षांर्थींनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, हेच विश्‍लेषण जसेच्या तसे 3 ते 5 वर्षांनी चालणार नसेल, इथे दाखविलेला फक्त नमूना आहे व ज्या त्या वर्षासाठी विद्यार्थ्यांनी त्यांचा स्वत:चा विश्‍लेषणाचा तक्ता बनविण्याची गरज असेल.

अभ्यासासाठी कोणती पुस्तके वापरावीत? याचे छान विश्‍लेषण केले आहे. नविन विषय असेल तर सर्वप्रथम त्याची तोंडओळख होणे गरजेचे असते. त्यासाठी NCERT ची पुस्तके व एकदा ती झाल्यानंतर त्या विषयाचे स्वत:ला नीट आकलन होण्यासाठी त्या विषयावरील दर्जेदार पुस्तके वाचली पाहिजेत. याचसोबत पुस्तक कसे वाचावे? नोट्स कशा काढाव्यात? याची उदाहरणे दिलेली आहेत.

लेखनाचा सराव करणे महत्त्वाचे. तसेच विचारलेल्या प्रश्‍नाचा रोख ओळखून त्या मुद्यावरहूकूम उत्तर लिहावे. उजळणी कशी करावी? त्याचप्रमाणे सराव चाचणीप्रश्‍न सोडवून आपली तयारीदेखील जोखली पाहिजे. निबंधाची तयारी व वैकल्पिक विषयांची तयारी याबाबींचा ऊहापोह केलेला आहे.

सध्या UPSC परीक्षेमध्ये CSAT ला फार महत्त्व आहे. कारण याचे मार्क्स जरी मोजले जात नसतील तरी यात पास मार्क्स न पडल्यास अनुत्तीर्ण मानले जाते. त्यामुळे याची विस्ताराने व विभागवार चर्चा केली आहे. ही चर्चा विद्यार्थ्यांच्या फार उपयोगाची आहे.

स्व:व्यवस्थापन कसे करावे? इंग्रजी कशी सुधारावी? याचबरोबर लेखकाने विद्यार्थ्यांचे प्रकार आणि परीक्षा नजीक असलेल्या काळात काय करावे? याचे छान विवेचन केलेले आहे.

या पुस्तकाला मी सुयश चिंतीते आणि लवकरच विद्यार्थ्यांना याचा लाभ मिळेल अशी आशा करते. शिवाय खालील काही टीप्सही सूचवू इच्छिते....

  • ग्रुपने अभ्यास केल्यास (किमान दोन जणांत) जास्त फायदा होतो.

  • यश हुलकावणी देत राहिल्यास आपण कधी थांबणार आहोत व पुढे काय करणार आहोत याची चर्चा परिवारात आधीच करून ठेवावी.

  • वेळापत्रकात दिवसाचे फक्त आठ तास अभ्यास होणार असतो, हे ध्यानात घ्यावे.

  • निबंधलेखन पहिल्या दिवसापासून व आठवड्याला एक याप्रकारे करावे. निबंध शक्यतो एखाद्या उत्तम शिक्षकाकडून तपासून घ्यावा.

  • या अभ्यासासाठी आपला एखादा Mentor शोधून त्यांचे मार्गदर्शन घेत रहावे.

  • आठवड्यातून एक सुट्टीचा दिवस ठेवावा. तसेच महिन्यातून एखादे अवांतर म्हणजे कथा, कादंबरी, तंत्रज्ञान, फिलॉसॉफी यांसारख्या पुस्तकाचे वाचन करणे गरजेचे असते.

  • एका तक्त्यात जुलै ते मार्च या महिन्यात आपण एकूण दहा लेखी विषयांपैकी कोणाचा किती अभ्यास करणार ते लिहावे. एप्रिल/मे/जूनचा साप्ताहिक तक्ता करून त्यात फक्त प्रिलिमच्या विषयांचे नियोजन विस्ताराने करावे. त्यापुढील जुलै ते ऑक्टोबर मुख्य परीक्षेसाठी सप्ताहवार तक्ता तयार करावा. त्या त्या नियोजनाप्रमाणे अभ्यास करावा. पण नियोजनात ठरलेला सगळाच अभ्यास दररोज पूर्ण होत नसेल तर निराश होऊ नये. वाटल्यास आपल्या क्षमतेप्रमाणे तक्ता नव्याने आखावा.

  • अभ्यासातील मुख्य Terminology, सूत्र, Quotable वाक्य इत्यादी खूप मोठ्या अक्षरात कागदावर लिहून ते कागद दारे/भिंती इत्यादींवर चिकटवून ठेवावे - तर येता जाता त्यांचे सहजगत्या वाचन व मनन होत राहते.

  • आपण काय अभ्यास केला याचा रोजचा अहवाल कोणाला तरी द्यावा - ग्रुपमधील मित्राला, परिवारातील सदस्याला, Mentor ला किंवा शेवटचा पर्याय म्हणजे स्वत:ला.

  • अवांतर वाचन केलेल्या विषयातील काय गोष्टी आपल्या अभ्यासाला नवी दिशा देतात ते तपासावे. अशा Connectivity चा खूप फायदा होतो.

असो.

जाता जाता एक महत्त्वाचे.

आपण या नोकरीत का येत आहोत? हा विचारही महत्त्वाचा आहे. तोच खर्‍या अर्थाने आपल्याला प्रेरणा देत असतो.

श्री. मनोहर भोळे यांचे पुन:श्‍च अभिनंदन. हे पुस्तक वाचून वाचकांचे UPSC परीक्षा उत्तीर्ण होण्याचे प्रयत्न योग्य वळणाने जातील व त्यांना यशलाभ देतील. ही सर्व वाचकांना शुभेच्छा.

श्रीमती लीना मेहेंदळे

(निवृत्त IAS)

leena.mehendale@gmail.com



Friday, August 16, 2019

मनुस्मृतिचै वीस्तव

खालील लेख सर्वांनी तटस्थ राहून वाचावा.
#मनुस्मृती_बद्दलचे_वास्तव…

#एकदा_सगळ्या_हिन्दू बांधवांनी वाचा आणि पुरोगमींची #तोंड बन्द करा

आजकाल हिंदू धर्माला आणि वैदिक संस्कृतीला मानणाऱ्या लोकांना मनुवादी म्हणायची Fashion आली आहे अशा महाभागांना काही साधे प्रश्न !!!!

१.मनुवादी मनुवादी म्हणून उर बडवून घेणार्यांनी मनु ब्राह्मण नव्हता तर क्षत्रिय होता हे आपणास माहित आहे काय??

२.खर तर जर्मनी सारख्या अनेक देशांनी त्यांची राज्यघटना तयार करताना मनुस्मृतीचा आधार घेतला आहे हे आपणास ठाऊक आहे काय???

३.संस्कृत ग्रंथ हे सूत्ररूपात असतात याचा अर्थ ती सूत्रे समजून देणारा लायक गुरु असला कि त्यांचा खरा अर्थ कळतो, हे महाभाग जी उदाहरणे देतात ती एकूण ग्रंथाच्या १% एवढीही नाहीत पूर्ण मनुस्मृती वाचली कि सहज कळते कि मनुने समाजाच्या प्रत्येक अंगाचा किती सूक्ष्म अभ्यास केला होता ….
आपण मनुस्मृती चा अभ्यास कोणत्या गुरूंकडे घेतलात ते सांगावे…आपण बाजारातली प्रत घेऊन वाचली असेल तर वर्तमानपत्रातले आरोग्य विषयक लेख वाचून एखाद्याने ‘मी डॉक्टर आहे ‘ असे म्हणण्यासारखे आहे….

४.एकाच प्रकारची चूक जर ब्राह्मण आणि शूद्राने केली तर ब्राह्मणाला शुद्रापेक्षा शंभर पटीने अधिक कडक शिक्षा करावी असे सांगितलेले आपण वाचले नाही वाटते…

५.वयोवृद्ध शूद्राला राजाने तसेच ब्राह्मणांनी देखील सन्मान द्यावा असे देखील मनुस्मृतीच सांगते ….

६.मनुने सांगितलेले वर्ण हे जन्मानुरूप नव्हते तर कर्मानुरूप होते म्हणजे शुद्राच्या पोटी जर हुशार मुलगा जन्माला आला तर तो वेदांचे शिक्षण घेऊन ब्राह्मण होत असे तसेच कोणताही व्यक्ती धर्मकार्य करून ऋषी होत असे ….. महर्षी व्यास, वाल्मिकी ऋषी, आचार्य चरक, आचार्य सुश्रुत, आचार्य कान्कायान अशी शेकडो उदाहरणे याबाबत सांगता येतात जे जन्माने ब्राह्मण नव्हते पण त्यांना हिंदू धर्माने निसंकोच ऋषीपद दिले ज्यात कित्येक चांडाळ आदि कनिष्ठोत्तम कनिष्ठ वर्णाचे होते ….
आणि या महान ऋषीनी सांगितलेले महान तत्वज्ञान आज हिंदू संस्कृतीची ओळख आहे ज्यात ब्राह्मण हा शब्द फार अपवादाने येतो….

७.मनुस्मृती हि तत्कालीन शासन पद्धती आहे जिचा काळ शेकडो वर्षांपूर्वीचा आहे आता उन्हाळ्यातले कपडे हिवाळ्यात जसे चालत नाहीत तसेच एवढे जुने शासन आताच्या काळात फक्त संदर्भ म्हणून वापरा एवढेच काय ते अभ्यासकांचे म्हणणे आहे हर जरी कळले तरी पुरेसे आहे ….
बाबासाहेबांनी आपल्या पूर्वायुष्यात मनुस्मृतीचे दहन केले हे सर्वांनाच माहित आहे. पण पुढे बाबासाहेबांनी तिच्याविषयी गौरवोद्गार काढले आणि तिचा आधार घेऊनच हिंदू कोड बिल बनवले हे कुणालाच माहित नसते.माहित असलेले लोकही राजकीय सोयीसाठी गप्प बसतात.दिनांक २४ फेब्रुवारी १९४९ रोजी संविधान निर्माती सभेसमोर केलेल्या भाषणात बाबासाहेब म्हणाले:-

“ज्या १३७ लोकांनी स्मृती लिहिल्या त्यामध्ये मी उल्लेखिलेल्या याद्न्यवल्क्य व मनू या स्मृती वरच्या दर्जाच्या आहेत.दोघांनीही मुलीचा चौथ्या हिश्श्यावर अधिकार आहे असे म्हटलेले आहे.
[मनुस्मृती,अध्याय ९,स्लोक ११७:-
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक।
स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव:॥
अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करे। ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.]
बाबासाहेब पुढे म्हणाले-कोणत्याही कारणाने का असेना पण रूढीने त्या ग्रंथाचा अधिकार नष्ट केला ही खेदजनक गोष्ट आहे. नाहीतर स्मृतीच्या आधारावर मुलीला चौथा हिस्सा हक्काने मिळाला असता.
प्रिव्ही कौन्सिलने दिलेल्या निर्णयाचा मला फार खेद वाटतो.त्याने आमच्या कायद्याच्या सुधारणेचा मार्ग बंद केला. आधीच्या एका प्रकरणात प्रिव्ही कौन्सिलने म्हटले आहे की कायद्यावर रूढी मात करते.त्यामुळे आमच्या न्यायाधीशांना आमच्या पुरातन ऋषींनी आणि स्मृतीकारांनी काय कायदे केले होते याचा शोध घेणे अगदी अशक्य झाले.
रूढी कायद्यावर मात करील असा प्रिव्ही कौन्सिलने निर्णय दिला नसता तर एकाद्या कायदेपंडिताला अगर एकाद्या न्यायाधीशाला याद्न्यवल्क्य स्मृती आणि मनुस्मृती प्रकाशात आणणे सहज शक्य झाले असते.आणि स्त्रियांना आज अधिक नसला तरी संपत्तीचा चौथा हिस्सा तरी उपभोगता आला असता.याबद्दल मला मुळीच शंका नाही.”
[रायटिंग ऐण्ड स्पीचेस,खंड १४वा,पान क्र.२५५वर सुरु होणारे भाषण]

११जानेवारी १९५० ला मुंबईला सिद्धार्थ महाविद्यालयाच्या संसदेसमोर बोलताना बाबासाहेब म्हणाले की मी जातिनिर्णयासाठी मनूचा, घटस्फोटासाठी पाराशर स्मृतीचा, स्त्रियांच्या हक्कासाठी बृहस्पतीच्या स्मृतीचा आधार घेतला आहे. दायभाग पद्धतीच्या वारसा हक्कासाठी मनुस्मृतीचा आधार घेतला आहे.
[समग्र भाषणे,खंड ८-पान क्र.१७-१८/जनता,१४-१-५०]

समाजशास्त्रीय दृष्ट्या बौद्ध,जैन व शीख हे हिंदूच असल्याचे प्रतिपादन बाबासाहेबांनी ६ फेब्रुवारी १९५१ ला संसदेत केले.[जनता,१०-२-१९५१]

दि.२५ डिसेम्बर १९५२ रोजी राजाराम चित्रपटगृहात बोलताना बाबासाहेब म्हणाले:-
“माझ्या बिलाच्या टीकाकारांनी ते हिंदू धर्मशास्त्रास सोडून आहे अशी टीका केली. पण तसे म्हणणार्यांना माझे आव्हान आहे की मनुस्मृतीचा आधार नाही असे त्यात कोणते कलम आहे ते त्यांनी दाखवून द्यावे.
एखादी स्त्री वारल्यास तिची संपत्ती तिच्या मुलीलाच मिळाली पाहिजे हा माझा हटवाद आहे.बाप मेल्यावर भाऊ-भाऊ बापाच्य संपत्तीची वाटणी करून घेतात .त्या भावाबरोबर त्यांच्या बहिणीलाही का वाटणी मिळू नये?[जनता,३जानेवारी१९५३]

बाबासाहेबांच्या म्हणण्याचा आधार असलेले मनुस्मृतीतील श्लोक:-
अध्याय ९मधील हे सर्व श्लोक आहेत:-

श्लोक ११७:-
स्वेभ्योंशेभ्यस्तु कन्याभ्य: प्रदद्युर्भ्रातर: पृथक।
स्वात्स्वादंशाच्चतुर्भां पतिता: स्युरदित्सव: ॥
अर्थ:-सभी भाइयों का कर्तव्य है कि वे अपने अपने भाग का चौथा भाग बहनों को प्रदान करें। ऐसा न करने वाले भाइयों को पतित कहा जाता है.

श्लोक १२९-
यथैवात्मा तथा पुत्र: पुत्रेण दुहिता समा ।
तस्यामात्मनि तिष्ठ्यंत्यां कथमन्योधनं हरेत ॥
अर्थ:-मनुष्य भी पुत्र रूप में जन्म लेता है और कन्या भी पुत्रतुल्य होती है.तो फिर कन्या के रहते हुए पुत्र का धन पराए लोग कैसे ले सकते है?

श्लोक १३०:-जो धन माता के द्वारा जोडा जाता है,वह पुत्री का ही होता है.

श्लोक १३२-मुलाच्या मुलांत आणि मुलीच्या मुलात काहीच भेद नाही.

श्लोक १३८-मुलाच्या आणि मुलीच्या मुलांत भेद करू नये.

श्लोक८९-ऋतुमती झाल्यानंतर पित्याने ३ वर्षाच्या आत वर निवडला नाही तर मुलीने स्वत:चा वर स्वत: निवडावा.

श्लोक १२-ज्या स्त्रिया स्वत:ची रक्षा स्वत: करतात त्या अधिक सुरक्षित असतात.

श्लोक१९१-सभी भाई तथा बहनें मां की मृत्यू के बाद उसकी संपत्ति अपने बीच समान रूप से बांट ले.

श्लोक १९२-पुत्रियों की अविवहित कन्याओं को भी नानी के धनसे प्रेमपूर्वक थोडा-बहुत धन प्रदान करना चाहिए.

श्लोक १९३-सहा प्रकारची स्त्री धने आहेत:- १.विवाच्या वेळेस आईवडिलांनी दिलेले. २.वेगवेगळ्या समारंभाच्या वेळीस माहेरी बोलावून दिलेले. ३.नवर्याने भेट म्हणून दिलेले. ४.वडिलांनी दिलेली. ५.आईने दिलेले. ६.भावाने दिलेले.

श्लोक१९४:-या स्त्रीधनावर तिच्या मुलांचा अधिकार आहे पण नवर्याचा नाही.

आर्यसमाजी पंडित गंगाप्रसाद उपाध्याय म्हणतात:-ज्या वाईट तत्वांनी हिंदू धर्मावर आक्रमण केले त्याच वाईट तत्वांनी मनुस्मृतीत प्रक्षिप्त श्लोक घुसवले.या प्रक्षिप्त स्लोकांसाठी मनुस दोषी ठरवता येणार नाही.

राजर्षि शाहू महाराजांना प्रिय असलेल्या सत्यार्थप्रकाश ग्रंथात मनुस्मृतीतले ५१४ श्लोक आहेत,जे समतावादी आणि अंधश्रद्धारहित आहेत.

या संदर्भात डा.बाबासाहेब आंबेडकरांचे सहकारी सोहनलाल शास्त्री यांनी एक मजेशीर आठवण सांगितली आहे. ते म्हणतात:-“बाबासाहेबांनी मला एके दिवषी बोलावले आणि सांगितले की माझ्या हिंदू कोड बिलातील कलमांना शास्त्रीय आधार शोधणारा एखादा आर्यसमाजी पंडित शोधून काढ.या कामासाठीआपण त्याला मानधनही देऊ.गुरुकुल कांगडीचे संस्कृत विद्वान स्नातक रामगोपाल विद्यालंकार यांना मी भेटलो.त्यांनी मला पंडित धर्मदेव विद्यालंकार यांना भॆटावयास सांगितले व ते संशोधनपर लेख आपल्या अर्जुन या नियतकालिकात छापण्याचे आश्वासनही दिले.त्याप्रमाणे बाबासाहेबांच्या हिंदू कोड बिलास स्मृतींचा आधार दाखवणारी लेखमाला ’वीर अर्जुन’मध्ये प्रकाशित झाली.बाबासाहेबांनी स्वत: ते लेख वाचले.आणि माझ्या करवी पं.विद्यालंकार यांना पाचहजार रुपयांचे मानधनही पोहचते केले.”
[पान क्र.८६-८७,२०१०ची आवृत्ती, बाबासाहब डा.आंबेडकर के सम्पर्क में पच्चीस वर्ष,सोहनलाल शास्त्री,सम्यक प्रकाशन]
*Forwarded as received*

Saturday, August 10, 2019

ईशान्यकी सैकडों बोलियोंकी गरिमाके लिये


ईशान्यकी सैकडों बोलियोंकी गरिमाके लिये
इस घटनाक्रमका आरंभ कुछ वर्ष पूर्व या कुछ सदियों पूर्वसे भी किया जा सकता है। लेकिन आरंभ करती हूँ फरवरी माहके किसी दिनसे, जब मैंने डिब्रूगड युनिवर्सिटीके लिये एक संकल्पना बनाकर भेजी। विषय था असमिया लिपीको बचाना – कम्प्यूटरपर असमिया लिपीसे ही आलेख लिखना।
पुणेसे सीधे दिब्रूगड? इसका कारण था। मुंबईकी सुश्री सविता औऱ श्री दिलीपजीने मुझे कईबार ये कहते सुना था कि और R अलग हैं, और A भी अलग हैं। इसलिये यदि मुझे कम्प्यूटपर राम शब्दको टंकित करना हैं तो मुझेद्योतक कुञ्जी खोजनी चाहिये कि R की। पर वे इसे समझ नही पाते थे। उनकी समझ कहती थी कि R की कुञ्जी ही तो की भी कुञ्जी है और A की कुञ्जी ही तो की भी है। फिर राम लिखने के लिये R,A,M क्यों नही लिखना चाहिये? मेरा उत्तर होता था कि आपके कम्प्यूटरमें अंगरेजीके R,A,Mकी बजाए अलग प्रकारसे लेखनके लिये , आकार, तथा की कुञ्जियाँ बनी हुई हैं औऱ उनकी जगहें ऐसी बनी हैं कि उनको स्मरण रखनेका तरीका अत्यंत सरलतम है। वह तरीका भारतीय वर्णमाला-अनुसारी है। यदि आपने उन्हें सीखकर उन्हींका प्रयोग आरंभ नही किया तो एक दिन आप अपनी पूरी वर्णमालाको भूलनेवाले हैं। इसी कारण राम लिखने के लिये की कुञ्जी खोजनी चाहिये कि R की। पर बात उन्हें फिर भी समझ नही आती थी।
आखिरकार एक दिन सविता मुझे आग्रहपूर्वक अपनी संस्थामे ले गई, कम्प्यूटर सेक्शनके लोगोंको भी बुलाया और कहा “दिखाइये”। मैने मिनिटमें ही जो वर्णमाला-आधारित INSCRIPT कुञ्जीपटल समझाया वह उनके लिये नया और किसी जादू जैसा था। दो-तीन बार जादू देखकर और फिर खुद भी कर पानेपर सभी लोग सुखद-आश्चर्यमें पड गये। तभी मैंने कहा कि अब आप किसी भी कन्नड, बंगाली, गुजराती भाषीसे कह सकतें है- आओ, तुम्हें तुम्हारी भाषा कम्प्यूटरपर लिखनेकी सरलतम विधी बताऊँ औऱ यही पटल उनकी लिपियोंमे भी लागू होगा। सविताके लिये बडा आश्चर्य यह था कि अब सविता लिखनेके लिये एस, , वी, इस प्रकार सोचनेकी गरज नही पडेगी सीधे , , इकार…. इस प्रकार लिखा जा सकेगा। देवनागरीके हर अक्षरके लिये पहले अँगरेजी कॉरस्पॉण्डिंग अक्षरके चिंतनकी आवश्यकताको अलविदा।
दिलीपजी दिब्रूगड युनिवर्सिटी के बोर्ड मेंबर हैं। वह बोले क्या आप हमारे असमिया छात्रोंको कम्प्यूटर पर असमिया लिपी सिखा सकती हैं ? “ बिलकुल
दिलीपजी कहा कि वे आभारी होंगे यदि मैं इसी पद्धतिसे असमिया सिखानेके लिये कोई टिप्पणी लिखूँ। जब मैंने उन्हें टिप्पणी दी तो दिलीपजीने कहा यह आप ही वहाँ चलकर समझाइये। फिर उन्होंने इसे दिब्रूगड युनिवर्सिटीको भेजा और अपनी ओरसे जोड दिया कि आसाम क्षेत्रकी कई अन्यान्य क्षेत्रीय बोलीभाषाओंके लिये भी यही तरीका उपयुक्त रहेगा क्योंकि अंग्रेजीमे स्पेलिंग बनाकर लिख पाना और अंग्रेजीमें लिखे स्पेलिंगसे दूर जगह बैठे व्यक्तिद्वारा सही उच्चारणका अनुमान लगा पाना दोनोंही कठिन हैं, जबकि भारतीय लिपियोंमें लिखा गया पूर्णतः उच्चारण-आधारित होनेके कारण दूर बैठे व्यक्तिको पढनेमें कोई कठिनाई नही होती। और असमिया या हिंदीका तो कहना ही क्या ये दोनों समृद्ध भाषाएँ आसाममें खूब चलती हैं। इसे सीखकर सभी विद्यार्थियोंका बहुत फायदा होगा। अतएव आरंभिक तौरपर दिब्रूगड युनिवर्सिटीमें मेरा लेक्चर–कम–हॅण्डस्आन–ट्रेनिंगका सेशन रखवाया जाय।
दिब्रूगड युनिवर्सिटीने भी इसे स्वीकार करते हुए इस व्याख्यानका कार्यक्रम नियत किया। शीघ्रही मुझे एक -मेल भेजकर रजिस्ट्रार डा. दत्ताने बताया कि मेरे प्रस्तावके अनुसार उनके विश्वविद्यालयमें मेरा दो घंटेका एक व्याख्यान प्रशिक्षण आयोजित कर रहे हैं। जब यह कार्यक्रम तय हो चुका तो सविताने सुझाव दिया कि इसी प्रकारका व्याख्यान मुझे बोडो युनिवर्सिटीमें भी देना चाहिये, क्योंकि बोडो जनजातिने अपनी बोलीको देवनागरीमें लिखनेका चुनाव किया है, लेकिन इस पद्धतिकी अनभिज्ञता वहाँ भी है। अतएव बोडो विद्यार्थीयोंको सुलभतासे कम्प्यूटरपर हिंदी लेखन िना उनके भविष्यकालीन व्यवसायों या नौकरीके लिये भी उपयुक्त होगा।
मुझे यह भी याद आया कि पिछले वर्ष अरूणाचलमें विवेकानन्द केंद्रसे भी उनके स्कूली शिक्षकों विद्यार्थीयोंके लिये ऐसेही हिंदी प्रशिक्षणकी बात चली थी और फिर रुक गई थी। मैंने झटपट इटानगरमें रुपेशजीको -मेल लिखा बतायें कि क्या क्या संभावनाएँ हैं ?
दिब्रूगड युनिवर्सिटीके व्याख्यानका दिन २७ मार्च तय हुआ था। रजिस्ट्रार श्री दत्ताने गुवाहाटी युनिवर्सिटीके लिये बात करने का आश्वासन दिया और गुवाहाटी युनिवर्सिटीमें रजिस्ट्रार तथा कम्प्यूटर विभागको पत्र भेजे। मैंने भी गुवाहाटी तथा बोडो युनिवर्सिटीकी संभावना सोचकर कुछ पत्र लिखे और कुल १० दिन आसाम क्षेत्रमे रुकनेकी योजना बनाई। गुवाहाटी स्थित मेरे एक पुराने सहयोगी देवजित भुइयाँने अपनी संस्थाके दो कॉलेजोंमे कार्यक्रम तय किया। गुवाहाटीमें ही विवेकानन्द सेंटर फॉर कल्चरकी एक कार्यकर्त्री मीरा कुलकर्णीने भी केंद्रमें एक कार्यक्रम आयोजित करनेका आश्वासन दिया। प्रत्यक्षतः अरुणाचलके स्कूलोंमे या युनिवर्सिटीमें कोई कार्यक्रम नही हो पाया क्योंकि हमारे जानेके दिनतक वहाँकी सभी शैक्षणिक संस्थाओंमें छुट्टियाँ आरंभ हो गई थीं। गुवाहाटी युनिवर्सिटीमें भी कोई अडचन आई लेकिन मीराने आयआयटी गुवाहाटीके सेंटर फॉर एनर्जी स्टडीजमें एक कार्यक्रम निश्चित किया। मुंबई आकाशवाणीके श्री आनंद सिंहने डिब्रूगड आकाशवाणीके एक अधिकारीसे मुलाकात तय करवा दी। माजुली मठसे जुडे मेरे परिचित श्री डम्बरु आजकल सिमलामें साहित्य-शोधपर लगे हैं, उनका आग्रह रहा कि मैं माजुलीके मठाधिकारी श्री पीताम्बरजीसे भी अवश्य मिलूँ जो उन दिनों टोएक गाँवमें अपने छोटे मठमें ठहरे थे। यह जोरहाट जिलेमें और दिब्रूगडसे मात्र घंटेकी दूरीपर था। तभी पुणेके ही मेरे अन्य परिचितने बताया कि उनके मित्रपरिवारसे श्री वैभव निंबाळकर आईपीएस जोरहाटमें एसएसपी हैं और मुझे उनसे भी मिलना चाहिये। इस प्रकार कार्यक्रम बनते चले गये।
-------------------------------------------------------------------------
दिनांक २६ मार्च २०१८, दोपहर १२ बजेके आसपास मैं पुणेसे तथा दिलीपजी मुंबईसे डिब्रूगड पहुँचे। इस बीच युनिवर्सिटीके कम्प्यूटर विभागके असोसिएट प्रो. श्री रिजवानका फोन आया था कि वे ही हमारे कार्यक्रमका संयोजन कर रहे हैं। मैंने उनसे आग्रह किया था कि हवाई अड्डेपर हमें लिवाने किसी अधिकारीके बजाए किसी विद्यार्थीको भेजें। इससे मेरा लाभ ये होता है कि अनायास ही युवापीढीके साथ अप-टू-डेट हुआ जाता है। हमे लिवाने विभूति नामक एक एमसीएका छात्र गया था। मेरा लेक्चर २७ की दोपहरमें था। इस कारण पिताम्बरजीने आग्रह किया था कि मैं २६ को ही टोएक मठमें जाऊँ और वहाँ रहकर २७ की सुबह वापस डिब्रूगड समयपर पहुँच जाऊँ। इसके लिये गाडीकी व्यवस्था करनेका जिम्मा रिजवानने लिया था।
रास्तेमें विभूतिसे हमारी बातें चल रही थीं। पूरा वातावरण ऐसा मानों हम महाराष्ट्रके ही कोंकण प्रदेशमें हों। वही नारियल, बाँस, उडहुलके फूल वगैरा। लेकिन बीच बीचमें लम्बे पट्टे दीख जाते थे चायबागानोंके। ऑइल कंपनियोंके कारण दिब्रूगडमें कई छोटे-बडे उद्योग भी हैं। अन्य कई राज्योंकी तुलनामें असममें शिक्षाका स्तर अधिक अच्छा है, स्त्री-पुरुष समानता है और पंद्रहवीं सदिके संत श्रीमन्त शंकरदेवजीके समाजसुधारक कार्यक्रमोंका बडा प्रभाव है। माजुली मठ भी उसी परंपरामें है। विभूतिने बताया कि युनिवर्सिटी पहुँचकर मुझे ४ बजे टोएकके लिये रवाना होना है। बातों बातोंमें उसने कहा कि वह भी जोरहाट निवासी ही है जो केवल स्नातकोत्तर पढाईके लिये डिब्रूगढ आया है। माँ-पिताजी दिब्रूगडमें हैं। मैंने उसे प्रस्ताव दिया -- यदि वह जोरहाट जाना चाहे तो मेरे साथ आ सकता है -- रिजवान सरसे अनुमति लेनेका दायित्व मेरा। वह भी खुशी खुशी तैयार हो गया।